Ad will apear here
Next
‘गोगटे-जोगळेकर’च्या निसर्ग मंडळातर्फे व्याख्यानाचे आयोजन
रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळातर्फे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली २० फेब्रुवारी २०१९ रोजी गावखडी येथील सरस्वती विद्यामंदिरमध्ये ‘समुद्री कासवांची जीवनशैली व त्यांचे संवर्धन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विक्रांत बेर्डे उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. दाते यांनी विद्यार्थ्यांना त्यांचा परिचय करून दिला.

या प्रसंगी बोलताना बेर्डे म्हणाले, ‘हजारो वर्ष उत्क्रांत होत गेलेले कासव हे मानवी आवडीचा व कुतूहलाचा विषय आहे. भारतीय संस्कृतीत कासवाला अध्यात्मिकदृष्ट्या विशेष स्थान आहे. कासवाचा आकार व त्याची शरीर वैशिष्ट्ये यांचा कुशल उपयोग आपण पुराणकथांमध्ये पाहू शकतो. कासवाचा प्रतिकात्मक उपयोग आपल्याला साहित्य चित्रकला जातककथा यामध्ये कुशलतेने केलेला दिसतो. भारतात मंदिरांमध्ये देवतेपुढे असलेले कासव हे ही असेच महत्त्वाचे मानले जाते. कासवांचे जमिनीवरील कासव, गोड्या पाण्यातील कासव, समुद्री कासव असे प्रमुख प्रकार आहेत. कासवांच्या सात प्रमुख प्रजाती आजवर आढळल्या आहेत. यातील पाच प्रकारची कासवे भारतीय उपखंडात आढळून येतात. यापैकी चार जाती भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळून येतात. उदाहरणार्थ ऑलिव्ह रिडले कासव, हिरवे कासव, चोच कासव, चामडी पाठीचे कासव. प्रत्येक कासवाची विशिष्ट शारीरिक वैशिष्ट्ये असतात. त्याद्वारे आपण त्यांच्या प्रजातीची ओळख पटवून घेऊ शकतो.’

‘मधल्या काळात कासवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे व ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत उदाहरणार्थ तेल गळती सारखे अपघात, मासेमारी, मानवाकडून किनारी भागांचा होणारा विध्वंस, कासवांच्या पाठीचा दागिन्यांसाठी केला जाणारा वापर यांसारख्या मानवी कृती त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. सध्या जगाच्या विविध भागांमध्ये कासवांच्या अधिवासांचे संरक्षण व त्यासाठीचे प्रशिक्षण देण्याचे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत,’ अशी माहिती बेर्डे यांनी दिली.

आपण कासव, तसेच त्यांच्या अधिवासाचे संवर्धन कसे करू शकतो व त्यामध्ये विद्यार्थी कसे सहभागी होऊ शकतात हे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. निसर्गाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी आपल्या व्याख्यानादरम्यान त्यांनी विविध चित्रफितींचे सादरीकरण केले; तसेच विद्यार्थ्यांना निसर्गाची स्वच्छता राखणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि निसर्गाचे संवर्धन आणि संगोपन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

सहाय्यक शिक्षक गिरीश पाध्ये यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य विवेक भिडे व प्रा. अतिका राजवाडकर, प्रा. हर्षदा मयेकर, प्रा. मयुरेश देव, प्रशालेतील शिक्षक तसेच या निसर्ग मंडळाचे स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात २४ सप्टेंबर १९८३ रोजी निसर्ग मंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांचा अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभाग वाढवणे व क्षेत्र अभ्यासातून त्यांना सक्षम बनविणे, विद्यार्थ्यांना वनस्पती व प्राण्यांच्या विविध प्रजातींची म्हणजेच जैवविविधतेची ओळख करून देणे, त्यांचे महत्त्व पटवून देणे व त्यांच्या संरक्षण व संवर्धन करण्याची गरज पटवून देणे असा या मंडळाचा उद्देश आहे. ‘कोकण किनाऱ्याला लाभलेल्या नैसर्गिक वारशाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात जागरूकता निर्माण करणे’ असे या मंडळाचे बोधवाक्य आहे. या मंडळाद्वारे महाविद्यालयात दर वर्षी प्रभात फेऱ्या, निसर्ग सहली, व्याख्याने, क्षेत्रभेटी, निसर्ग छायाचित्रणासाठीच्या कार्यशाळा, त्यासाठीचे प्रशिक्षण, विविध प्रकल्प, वृक्षारोपण तसेच स्वच्छता मोहीम आदी उपक्रम राबविले जातात.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZJABX
Similar Posts
रत्नागिरीत १६ मार्चला बावडेकर विज्ञान व्याख्यानमाला रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे भूतपूर्व प्राचार्य डॉ. वि. के. बावडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रति वर्षी विज्ञान व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या व्याख्यानमालेतील ३३वे पुष्प गोवा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. एम. के. जनार्दनम् गुंफणार आहेत.
‘संस्कृत ही वैज्ञानिक भाषा’ रत्नागिरी : ‘संस्कृत ही ठराविक समाजाची भाषा नाही. संस्कृत ही वैज्ञानिक भाषा असून, अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण साहित्य आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या संस्कृत केंद्राद्वारे अनेक जण संस्कृत शिकत आहेत. लोकांना याचा फायदा होत आहे,’ असे प्रतिपादन या केंद्राचे शिक्षक हिरालाल शर्मा यांनी केले
रत्नागिरीतील विद्यार्थी घालणार दीड लाख सूर्यनमस्कार रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे १६ फेब्रुवारी २०१९ रोजी दीड लाख सूर्यनमस्कारांच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोसायटीच्या शाळा, गुरुकुल आणि शहरातील अन्य शाळांमधील सुमारे चार ते पाच हजार विद्यार्थी, नागरिक, शिक्षक असे सर्व जण मिळून एकूण दीड लाख सूर्यनमस्कार या वेळी घालणार आहेत. पहाटे
‘गोगटे-जोगळेकर’च्या विज्ञान विभागाला ‘आयएसओ’ रत्नागिरी : ‘गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. मुंबई विद्यापीठच नव्हे, तर जागतिक स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी गुणवत्ता शिक्षण येथे दिले जाते, हे सिद्ध करण्यासाठी या मानांकनाची गरज आहे. आगामी काळात ग्रंथालय आणि कार्यालयीन विभागांनाही हे मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language